काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्मृती इराणी यांच्या बाबत मोठं विधान केलं आहे. जय पराजय हा जीवनाचा भाग आहे, तो सुरूच राहिल. त्यामुळे भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्याविरोधात अपमानास्पद भाषा वापरू नका, असं आवाहन त्यांनी सर्व नेत्यांना केलं आहे. स्मृती इराणी किंवा इतर कोणत्याही नेत्याबाबत अपमानास्पद भाषा वापरणे आणि वाईट वागणं टाळावं, असं त्यांनी म्हटलं आहे.
स्मृती इराणी यांच्यासह चार माजी केंद्रीय मंत्र्यांनी ल्युटियन्स दिल्लीतील त्यांचा सरकारी बंगला रिकामा केला असल्याचं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे सरकारमध्ये सामील होणाऱ्या नव्या मंत्र्यांना बंगले वाटप करण्याबाबतही गुरुवारी बैठक झाली. या बैठकीनंतर केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांना कृष्ण मेनन मार्गावरील 3 येथे बंगला दिला जाण्याची शक्यता आहे. हा बंगला पूर्वी माजी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना देण्यात आला होता.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी अमेठी मतदारसंघातून स्मृती इराणी यांचा दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. यापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पराभव करून मोठा विजय मिळवला होता. यानंतर त्यांना सरकारमध्ये महिला व बालविकास मंत्रिपद देण्यात आलं होतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.