कॉँग्रेसने भारत बलाढ्य केला.. सेवा दलाने काँग्रेसला ताकद दिली.. पृथ्वीराज पाटील
सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अरुण पळसुले यांनी स्वागत केले.सेवा दल जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी प्रास्ताविकात काँग्रेस व सेवा दलाची वाटचाल व योगदान सांगितले. प्रा. एन. डी. बिरनाळे म्हणाले, 'काँग्रेस पक्षामुळे देशाचा चौफेर विकास झाला आहे. कृषिप्रधान भारत काँग्रेसने मजबूत केला आहे. नेहरू.. पटेल.. गांधी.. बोस व अनेक कुटुंबियांच्या त्यागातून हा देश उभा राहिला आहे. पक्षाच्या असंख्य नेत्यांनी रक्त सांडून स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. यासाठी घरघरमें काँग्रेस.. मनमनमें काँग्रेस.. तिरंगा बचाव अभियान राबवू या. ''
अशोक वारे यांनी मनोगत व्यक्त केले. कालीचरण साधूंनी म. गांधी यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याने त्यांचा निषेध ठराव बाबगोंडा पाटील यांनी मांडला. यावेळी काँग्रेस व सेवा दलाच्या वतीने कालीचरण साधूचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी अल्लाबक्ष मुल्ला, अरुण पळसुले, सुभाष पट्टणशेट्टी, आयुब निशानदार, विठ्ठल काळे, हणमंत यादव, शमशाद नायकवडी, जन्नतबी नायकवडी, रामलिंग परदेशी, अशोक रजपूत सुनिता मदने, नीलम कांबळे, सुजाता सुर्यवंशी, दीपक सुर्यवंशी, अशोक वारे, रजिया अन्सारी, राजू कलाल, मदन पाटील, सुरेश पाटील, माया आरगे, श्रीधर बारटक्के, वसंत आरगे, बाबगोंडा पाटील, खुदबुद्दीन मुजावर, नामदेव पठाडे, प्रणव सुर्यवंशी व मुफीन कोळेकर व पक्ष आणि सेवा दल कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.