सांगली :- बाजार, सिटी बसस्थानक तसेच गर्दीच्या ठिकाणी गहाळ झालेले नागरिकांचे 15 मोबाईल शोधून त्यांना परत देण्यात आले. या सर्व मोबाईलची किंमत सुमारे 2.25 लाख रुपये असल्याची माहिती विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत
असणारे विविध बाजार, सिटी बसस्थानक, गर्दीची ठिकाणे येथे अनेक नागरिकांचे
मोबाईल गहाळ झाले होते. याबाबत पोलीस ठाण्यात नोंदही करण्यात आली होती. ते
मोबाईल तांत्रिक तसेच अन्य माहितीच्या आधारे शोधण्याच्या सूचना पोलीस
उपाधीक्षक एम. विमला यांनी दिल्या होत्या.
त्यानुसार निरीक्षक भालेराव यांचे पथक गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेत होते. तांत्रिक माहितीच्या आधारे पथकाने सांगली तसेच अन्य जिल्ह्यातून मोबाईल शोधून काढले. ते मोबाईल संबंधित नागरिकांना उपाधीक्षक श्रीमती विमला, निरीक्षक भालेराव यांच्याहस्ते परत देण्यात आले. विश्रामबाग पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक चेतन माने, पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांचन, घेरडे, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकार, कोळेकर, पाटील, गायकवाड, जगदाळे, बामने, सायबर पोलीस ठाणेचे पोलीस उप-निरीक्षक अफरोज पठाण, कॅप्टन गुंडवाडे, साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.