सांगली :- पहिले लग्न झालेले असताना एका विवाहितेने अन्य चौघांच्या मदतीने वरास दिड लाख रुपयांना गंडा घातला. याबाबत पा च जणांविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कृष्णा सुभाष जाधव (वय ३५, रा. पंचशीलनगर, मंडगुळे प्लॉट झोपडपट्टी, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यामध्ये पल्लवी मंदार कदम (मूळ नाव : परवीन मोदीन मुजावर. रा. रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, गांधीनगर, कोल्हापूर ), एजंट - राणी कुंभार (पूर्ण नाव माहित नाही, रा. पंचशीलनगर), राधिका लोंढे (रा. मिरज ), सुमन वाघमारे (रा. मिरज) आणि नाईक बाई (पूर्ण नाव माहित नाही, रा. कलानगर, सांगली) यांचा समावेश आहे. ही फसवणूकीची घटना दि. ९ सप्टेंबर २०२४ ते दि. ८ डिसेंबर २०२४ या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी कृष्णा जाधव हा खाजगी नोकरी करतो. संशयित पाच जणांनी संगनमत करुन परवीन मुजावर हिचे लग्न झालेले असताना देखील फिर्यादी कृष्णा समवेत तिचे दुसरे लग्न लावून दिले. याकरिता फिर्यादीकडून दिड लाख रुपये घेतले. ही बाब काही दिवसांनी फिर्यादी कृष्णा जाधव यांच्या समजली. वास्तविक संशयित पल्लवी उर्फ परवीन हिचे पहिले लग्न मंदार कदम याच्यासमवेत झाले होते.मात्र ही बाब संशयितांनी फिर्यादी कृष्णा जाधव याच्यापासून लपवून ठेवली. परवीन ही मुस्लिम धर्माची असून देखील पल्लवी कदम या नावाने स्वत:ची ओळख लपविली असल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी फिर्याद दाखल होताच संशयित पल्लवी कदम आणि एजंट राणी कुंभार यांना अटक केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.