Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

छगन भुजबळांना मंत्रिपद का नाकारलं? संजय राऊतांनी सांगितलं मोठं कारण.

छगन भुजबळांना मंत्रिपद का नाकारलं? संजय राऊतांनी सांगितलं मोठं कारण.
 

महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा पवार) ज्येष्ठ नेते, छगन भुजबळ यांना वगळण्यात आलं आहे. त्यामुळे छगन भुजबळ नाराज झालेले आहेत. भुजबळांना वगळल्यानं कार्यकर्ते नाराज झाले असून ठिकठिकाणी टायर जाळून निषेध करण्यात आला आहेत.

 

आता छगन भुजबळ यांना वगळण्यामागाचं मोठं कारण शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. भुजबळ यांनी शरद पवार यांची साथ सोडली. ती क्लेषदायक होती. ज्याला त्याला कर्माची फळ मिळतात, असं म्हणत संजय राऊत यांनी भुजबळ यांना टोला लगावला आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

 

संजय राऊत म्हणाले, "छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळण्यामागे जातीय राजकारण आहे. भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानं ज्यापद्धतीनं शरद पवार यांची साथ सोडली, ती सगळ्यांना क्लेषदायक होती. ज्याला त्याला कर्माची फळ मिळतात. ती भविष्यात आम्ही पाहत राहू."

तानाजी सावंत, दीपक केसरकर यांनाही मंत्रिपदातून वगळण्यात आलं आहे, याबद्दल विचारल्यावर संजय राऊत यांनी म्हटलं, "अडीच-अडीच वर्षांचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला असल्याचं मी ऐकलं आहे. खरे म्हणजे सहा-सहा महिन्यांचा फॉर्म्युला असता, तर सगळ्यांना मंत्रिपदे मिळाली असती. याचा अर्थ आहे, आमच्याकडील सोडून गेलेली लोक सत्ता, मोह आणि पैशांसाठी गेले. ज्यांच्या भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेचे आरोप होते, अशा अनेकांना वगळण्यात आलं आहे."


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.