कर्नाटकतील एका तहसीलदाराने सरकारी कार्यालयांतील कार्यप्रणाली आणि कर्मचाऱ्यांचा वाढत असलेला ताणतणाव यावरून नाराजी व्यक्त केली आहे. तहसीलदार महोदयांचे म्हणणे आहे की, सरकारीनोकरीत काहीच ठेवलेले नाही, आमच्यापेक्षा चांगले तर पानी-पुरी अथवा गोबी मंचुरियनचा ठेला चालवणारे आहेत.
त्यांची कमाईदेखील आमच्यापेक्षा अधिक आहे. होलेनरसीपूर येथील तहसीलदार केके कृष्णमूर्ती हे तालुक राज्य सरकारी कर्मचारी संघाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, "ठेला चलाणारे दबावापासून मुक्त होऊन आनंदात जीवन जगत आहेत. ते सुट्ट्यांवर जाऊ शकतात. शांततेत घरी परतू शकता आणि आपल्य जीवनाचा आनंद घेऊ शकतात. या उलट सरकारी अधिकारी नेहमीच तणावाचा सामना करत असतात. एवढेच नाही, तर आपल्या कुटुंबाला मंदिरातही नेऊ शकत नाहीत."
तहसीलदार साहेब पुढे म्हणाले, "तंत्रज्ञानामुळे कामाचा ताण कमी होण्याऐवजी वाढला आहे. वरिष्ठ अधिकारी व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे कामांवर लक्ष ठेवतात. त्याच दिवसात निकाल मागतात. उशीर झाल्यास विभागीय चौशी होते अथवा चौकशीच्या नावाखाली धमकावले जाते."
मुलांना शिकवण्याऐवजी अंडी खाऊ घालताय शिक्षक -
कृष्णमूर्ती पुढे म्हणाले, "गावातील लेखापाल सूडाच्या भीतीने त्यांच्या संघर्षाचा आवाज उठवू शकत नाहीत आणि शिक्षकांवर शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मुलांना अंडी आणि नाश्ता वाटप करण्यासारख्या सरकारी योजनांच्या तणावाखाली आहेत."
वाढते आजारपण आणि निवृत्ती -
यावेळी तहसीलदार कृष्णमूर्ती यांनी, हाई ब्लड प्रेशर, शुगर तथा किडनी आणि लिव्हरच्या वाढत्या आजारपणांचा हवाला देत, अधिकाऱ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांसंदर्भात चिंता व्यक्त केली. एवढेच नाही तर, अत्यंतिक ताणतणावामुळे आपण स्वैच्छा निवृत्तीसंदर्भातही विचार करत आहोत, असेही यावेळी तहसीलदार साहेबांनी म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.