ईव्हीएम हॅकिंगच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी देशमुख बंधूंच्या निकालाकडे दाखविले बोट; म्हणाले, "लातूरमध्ये."
विधानसभा निवडणुकीचा लागल्यानंतर महायुतीला प्रचंड असे बहुमत मिळाल्याचे दिसले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होते. ४८ पैकी ३० जागांवर थेट विजय आणि एका ठिकाणी अपक्षाचा विजय झाला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत मविआचे सपशेल पानिपत झाले. निकालानंतर विरोधकांकडून आणि विशेषतः काँग्रेस पक्षाकडून ईव्हीएमच्या विरोधात आक्षेप घेण्यात येत आहे. या आक्षेपांवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. विरोधक विनाकारण त्रागा करत असल्याचे ते म्हणाले. यासाठी त्यांनी लातूर आणि नांदेड जिल्ह्याचे उदाहरण दिले.
इंडिया टुडे वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईव्हीएमबद्दल विरोधक आरोप करत असल्याचा प्रश्न विचारण्यात आला होता. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले, "विरोधक पराभवाचे आत्मचिंतन न करता जोपर्यंत स्वतः सत्य स्वीकारत नाही, तोपर्यंत त्यांचा पक्ष पुढे येणार नाही." हे सांगत असताना फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील देशमुख बंधूंच्या लढतीचा आणि नांदेडमधील लोकसभा पोटनिवडणुकीचा हवाला दिला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "लातूर जिल्ह्यात लातूर शहर विधानसभेत अमित विलासराव देशमुख आणि लातूर ग्रामीणमध्ये धीरज विलासराव देशमुख निवडणूक लढवत होते. त्यापैकी धीरज देशमुख यांचा पराभव झाला. तर अमित देशमुख यांचा विजय झाला. म्हणजे लातूर ग्रामीणमध्ये ईव्हीएम हॅक झाले, पण लातूर शहरात ते झाले नाही का? अशाच प्रकारे ते लोकसभेला जिंकले, तेव्हा ईव्हीएममध्ये काहीच अडचण नव्हती का?"लातूरमध्ये काय निकाल लागला?
तसेच झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा विजय झाला, तिथे त्यांना ईव्हीएमवर शंका नाही. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्यावेळी आम्ही नांदेडमध्ये जिंकलो, पण त्याच दिवशी लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार जिंकला. तिथेही त्यांना काही अडचण वाटली नाही. त्यामुळे काँग्रेसने आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या अटीतटीच्या लढतीत अमित विलासराव देशमुख यांनी विजय मिळविला. प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपाच्या नेत्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी त्यांना कडवी झुंज देत तब्बल १,०६,७१२ मते मिळवली. अमित देशमुख यांनी ७,३९८ च्या मताधिक्याने विजय मिळविला.
लातूर शहर विधानसभेचा निकाल
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात अमित देशमुख यांचे कनिष्ठ बंधू धीरज देशमुख निवडणुकीला उभे होते. दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या धीरज देशमुख यांना यावेळी पराभवाचा सामना करावा लागला. भाजपाचे रमेश कराड यांनी तब्बल १,१२,०५१ मते मिळवत धीरज देशमुखांचा ६५९५ एवढ्या मताधिक्याने पराभव केला. तर धीरज देशमुख यांना १,०५,४५६ एवढी मते मिळाली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.