Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking : 'शिंदेंना नाराज व्हायचं काही कारणच नाही, कारण...' अमित शाहांचं सूचक विधान

Big Breaking : 'शिंदेंना नाराज व्हायचं काही कारणच नाही, कारण...' अमित शाहांचं सूचक विधान
 
 
नवी दिल्ली: 'एकनाथ शिंदेंनी नाराज होण्याचं काही कारणच नाही. आमच्या खूप जास्त जागा आहेत. 2019 मध्ये देखील आमच्या भरपूर जागा होत्या. परंतु तरीही आम्ही शिंदेंना मुख्यमंत्री बनवलेलं.' असं मोठं आणि अत्यंत सूचक असं विधान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. 'अजेंडा आज तक 2024' या विशेष कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी हे विधान केलं आहे.

'शिंदेंनी नाराज होण्याच कारणं नाही', पाहा नेमकं काय म्हणाले अमित शाह

प्रश्न: वर्तमान राजकारणात एवढा मोठा विजय फार कमी वेळा पाहायला मिळतो. मागील 30 वर्षात हे दिसून आलं आहे की, जे लोकसभेत होतं तेच साधारण विधानसभेत होतं. त्यामुळे आपण महाराष्ट्रात आता हा विजय कसा मिळवला?

अमित शाह: '2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देखील नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना बहुमत मिळालं होतं. शिवसेना जा जागांवर लढली तिथे आमचे उमेदवार नव्हते. आम्ही तिथे लढलो नव्हतो तर आम्ही जिंकू शकत नव्हतो. शिवसेना आमच्यासोबत तर आमच्या युतीला संपूर्ण बहुमत मिळालं होतं. पण मुख्यमंत्री बनण्याची लालच यामुळे उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत विश्वासघात केला. फक्त आमच्याशीच नव्हे तर महाराष्ट्राने जो जनादेश दिला होता त्याचाशीही विश्वासघात केला होता.'
 
'त्यावेळी देखील आम्हाला 2/3 बहुमत होतं आणि आजही आम्हाला 2/3 बहुमत आहे. त्यावेळी आमच्यासोबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विश्वासघात केला होता. जनतेने ती गोष्ट लक्षात ठेवली आणि त्यानंतर आमचं जे अडीच वर्ष सरकार होतं. त्यात आम्ही जी विकासाची कामं केली. याशिवाय मोदी सरकारचा 10 वर्षाचा चांगला कारभार हे देखील आमच्यासाठी जमेची बाजू होती. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर आमचा प्रचंड विजय झालेला आहे.'

प्रश्न: बाहेरून पाहिलं तर असं दिसतंय की, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोडेसे नाराज आहेत. कारण की, तुम्ही त्यांचा चेहरा दाखवला. लाडकी बहीण योजना आणल्या.

अमित शाह: 'हे बघा.. आपल्या लोकांचं कारण आहे की, नाराजी शोधत राहणं. शिंदेंनी नाराज होण्याचं काही कारणच नाही. आमच्या खूप जास्त जागा आहेत. 2019 मध्ये देखील आमच्या भरपूर जागा होत्या. परंतु तरीही आम्ही शिंदेंना मुख्यमंत्री बनवलेलं. अडीच वर्ष संपूर्ण विश्वासाने आम्ही विश्वासाने त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलो.'

'यंदा आम्ही सुरुवातीपासूनच सांगत आलो होतो की, मुख्यमंत्री कोण होईल हे निवडणुकीनंतर ठरवलं जाईल. यासाठी कोणालाही नाराजी ठेवण्याची काही गरजही नाही आणि कोणी तशी नाराजी ठेवत देखील नाही.'

प्रश्न: तुम्हाला मंत्रिमंडळ, खाते वाटप करतानाही अडचणी येत असतील ना?

अमित शाह: 'मंत्रिमंडळ वाटपात कोणतीही अडचण नाही. आम्ही जसं ठरवलं आहे त्याप्रमाणे आमचा सगळा कार्यक्रम सुरू आहे. महाराष्ट्रात पहिले आघाडीचं सरकार होतं. त्या सरकारपेक्षा आम्ही 3-3 दिवस पुढेच आहोत.' असं अमित शाह यावेळी म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.