Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संतापजनक! प्रेमविवाहानंतर मित्रांना बोलवून सामूहिक बलात्कार अन,....

संतापजनक! प्रेमविवाहानंतर मित्रांना बोलवून सामूहिक बलात्कार अन,....


लखनौ (उत्तर प्रदेश) : एकाने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्यानंतर आपल्या पाच मित्रांना घरी बोलवले आणि त्यांच्यासोबत दारू प्यायला. यानंतर त्याच्या पाचही मित्रांनी त्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना रायबरेलीमध्ये घडली आहे. यानंतर पेट्रोल टाकून महिलेला जिवंत जाळण्यात आले आहे.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. चुरुवा गावात शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. जितू सिंह याचा प्रेमविवाह दोन वर्षांपूर्वी उत्तराखंडमधील एका युवतीसोबत झाला होता. जितू सिंहने शनिवारी आपल्या पाच मित्रांना घरी बोलावले होते. प्रथम त्यांनी एकत्र बसून दारू प्यायली, त्यानंतर त्याच्या साथीदारांनी त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. प्रकरण लपवण्यासाठी त्यांनी तिच्यावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

जितू सिंहने पत्नीवर आपल्याच पाच साथीदारांनी सामूहिक बलात्कार करायला सांगितल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. यानंतर तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी सीओ महाराजगंज यदुराम पाल यांनी सांगितले की, या प्रकरणातील आरोपी जितू हा चुरवा येथील रहिवासी असून त्याने उत्तराखंडमधील एका मुलीशी लग्न केले होते. पत्नीच्या डोक्याला दुखापत झाली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून जितूला अटक करण्यात आली आहे. इतर दोषींवर कारवाई केली जाईल. पोलिस पुढील तपास करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.