लखनौ : उत्तर प्रदेशमधल्या बदायू जिल्ह्यातील बिसोली - गावातील एक धक्कादायक घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे, तेथे एका महिलेले नवऱ्याचा कंटाळा आला म्हणून चक्क सास-यासोबत लग्नगाठ बांधली.
विशेष म्हणजे, दोघांना अपत्यप्राप्तीही झाली आहे. सासरा आणि सून गायब झाल्यानंतर नवऱ्याने पोलिसांत फिर्याद नोंदवली, शोध घेऊनही दोघांचा पत्ता लागला नाही. अखेर जेव्हा ते सापडले, तेव्हा त्याच्या पत्नीने पतीच्या वडिलांबरोबर म्याणजे सासन्याकरोबर पळून जाऊन लग्न केल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. आपण स्वतःच्या मर्जनि सासऱ्याबरोबर लग्न केल्याची कबुलीही तिने दिली आणि लग्न झाल्याची कागदपत्रेही पोलिसांना सादर केली. अखेर दोघांनाही सोडून देणे पोलिसांना भाग पडले. या दोघांना सध्या दोन वर्षाचा मुलगा आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.