Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केदारनाथमधून 228 किलो सोने गायब, शंकचरार्याचां मोठा आरोप, म्हणाले नरेंद्र मोदी...

केदारनाथमधून 228 किलो सोने गायब, शंकराचार्य यांचा मोठा आरोप, म्हणाले नरेंद्र मोदी...


आम्ही सनातन धर्माचे पालन करणारे लोक आहोत. पुण्य आणि पापाची भावना येथे स्पष्ट केली आहे. गोहत्या हे सर्वात मोठे पाप असल्याचे म्हटले आहे. त्याहूनही मोठा हल्ला म्हणजे विश्वासघात असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात झाला आहे. यामुळे प्रत्येकाच्या हृदयात वेदना होत आहेत असे सांगून ते म्हणाले, ठाकरे यांचे सरकार पाडणे ही चांगली गोष्ट नाही. विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही. याचा त्रास संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला होत आहे. जे सत्य असेल तेच शंकराचार्य सांगतील असे ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले.

शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरून ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मात्रोश्री निवासस्थानी भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची कुटुंबासह भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यावर चर्चा केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संबंधित प्रकरण, दिल्लीतील प्रतीकात्मक केदारनाथ मंदिर, केदारनाथ धामचे 228 किलो सोने गायब झाल्याच्या मुद्द्यांवरून सरकारला सवाल केले.
केदारनाथमध्ये सोन्याचा घोटाळा झाला आहे. 228 किलो सोने गायब झाले आहे. त्याची आजतागायत चौकशी झालेली नाही. याला जबाबदार कोण? आम्ही दिल्लीत प्रतीकात्मक केदारनाथ बांधू. पण हे होऊ शकत नाही. केदारनाथ हिमालयात आहे. तुम्हाला केदारनाथचे स्थान का बदलायचे आहे? हा चुकीचा प्रयत्न आहे. राजकीय हितसंबंध असलेले लोक आमच्या धार्मिक स्थळांमध्ये घुसत आहेत अशी टीका त्यांनी केली. नरेंद्र मोदी माझे शत्रू नाहीत. आम्ही पंतप्रधान मोदींचे शुभचिंतक आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शंकराचार्य यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी हे शंकराचार्यांना शोभत नाही अशी प्रतिक्रिया दिली. जगतगुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदजी हे धार्मिक कमी आणि राजकीय जास्त आहेत. ठाकरे यांना भेटणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. त्यावर आक्षेप नाही. पण, शिवसेनेच्या अंतर्गत वादावर राजकीय भाष्य करणे त्यांनी टाळायला हवे होते. मुख्यमंत्री कोण होणार आणि कोण नाही, हे जनता ठरवेल, शंकराचार्य नाही. विश्वासघात करणारे हिंदू असू शकत नाहीत. हे फार विचित्र तर्क आहे. सर्वप्रथम हे ठरवावे लागेल की विश्वासघात कोणी केला? आणि शंकराचार्य हे ठरवू शकत नाहीत असे संजय निरुपम यांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.