Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'मला प्लीज भेटायला ये सारिता म्हणून जंगलात बोलावलं' 15 मिनिटं चालला आणि..........

'मला प्लीज भेटायला ये सारिता म्हणून जंगलात बोलावलं' 15 मिनिटं चालला आणि..........

लखनऊमधील काकोरी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या बहरू गावात अतिशय भयंकर घटना घडली आहे. प्रेम प्रकरण चालू असताना लग्न करावं म्हणून प्रेयसीने प्रियकराच्या मागे तगादा लावला होता. मात्र त्या दबावामुळे प्रियकराने प्रेयसीची निर्घृण हत्या केली.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका हत्येची थरारक घटना घडलीय. एका प्रियकराने प्रेयसीची हत्या केली. पोलिसांनी सांगितलं, की प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यात फास अडकवून साधारणपणे 100 मीटर तिला ओढत नेलं. त्यानंतर झाडावर लटकवून तिला मारलं. पोलिसांच्या चौकशीत त्याने ही कबुली दिलीय. आधी 15 मिनिटं तो तिला मारत राहिला. तिची शुद्ध हरपली, तेव्हा त्याने ओढणीनं तिचा गळा आवळून हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊमधील काकोरी पोलीस ठाणे क्षेत्रातल्या बहरू गावात राहणाऱ्या ब्रजेश आणि सरिता या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं. काही दिवसांनी सरितानं लग्न करण्याची मागणी केली तेव्हा ब्रजेशनं नकार दिला. तेव्हा सरितानं त्याच्यावर दबाव टाकला आणि जेलमध्ये पाठवण्याची धमकी दिली. यामुळे संतापलेल्या ब्रजेशनं तिची हत्या करण्याचा कट रचला. ब्रजेशला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं, तरीही सरिता लग्नासाठी त्याच्या मागे लागली होती. त्याचाच राग आल्यामुळे ब्रजेशनं सरिताचा काटा काढायचं ठरवलं.

सरिताला मार्गातून बाजूला करण्यासाठी ब्रजेशनं तिला भेटण्यासाठी बोलावलं. भेटल्यावर त्यानं तिला कारमधून 20 ते 25 किलोमीटर फिरवलं. सकाळी त्यानं तिला लग्न न करण्याबाबत पुन्हा सांगितलं. त्यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झालं. तेव्हा ब्रजेशनं सरिताला मारायला सुरुवात केली. मग त्यानं सरिताच्याच ओढणीने तिचा गळा आवळला. नंतर तिला 100 मीटर ओढत नेलं आणि झाडावर लटकवलं. सरितानं आत्महत्या केली असेल, असं भासवण्याचा त्याचा प्रयत्न होता.

पोलिसांनी मृतदेहाचं शवविच्छेदन केलं, तेव्हा रिपोर्टमध्ये सरिताच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या. आरोपीनं हत्येच्या कटाची अंमलबजावणी करण्याआधी मित्रासोबत दारू प्यायली होती. त्यानंतरच सरिताला फोन करून भेटायला येण्याबाबत सांगितलं होतं. आरोपीचं मोबाईल लोकेशन ट्रेस केल्यावर पोलिसांना त्याचा पत्ता कळाला व लगेचच त्याला अटक करण्यात आली. देशात घडणाऱ्या हत्या व खुनासारख्या गंभीर घटनांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराबरोबरच असफल प्रेम प्रकरणांचाही मोठा वाटा आहे. अज्ञान, अपरिपक्वता यामुळे प्रेम प्रकरणांतून हत्या केल्याच्या घटना वाढत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.