Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

परत एकदा गोधरा हत्याकांडाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नकरता येणार नाही :.राज्य प्रवक्ते संतोष पाटील.

परत एकदा गोधरा हत्याकांडाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नकरता येणार नाही :.राज्य प्रवक्ते संतोष पाटील.


भारतातील सर्वांचे श्रद्धास्थान असणारे रामलल्लाचे भव्य राम मंदिर येत्या 22 जानेवारीला आयोध्यामध्ये सर्व रामभक्तांच्या दर्शनासाठी प्राणप्रतिष्ठा करून सर्वांसाठी खुले होत आहे. यासाठी देशभरातील कोट्यावधी रामभक्त रामलल्लाच्या दर्शनासाठी आयोध्या नगरीत येत आहेत. अयोध्यात 1992 रोजी बाबरी मज्जिद पाडण्यासाठी लाखो  कारसेवक आयोध्यात आले होते. गुजरात मधून आलेले कारसेवक परत जात असताना रेल्वेच्या दोन डब्यामध्ये 150 कार सेवकांचा रेल्वेचे दोन डबे पेटवून देऊन त्यांचा मृत्यू झाला होता. परंतु काही गुप्त माहितीच्या आधारे,ज्या व्यक्तींच्या घरातील मृत्यू झाला त्या व्यक्तींच्या कुटुंबाच्या माहितीच्या आधारे अशी माहिती मिळाली होती की जे कारसेवक म्हणून 150 लोक गोधरा रेल्वे स्टेशनवर मारले ते कारसेवक नसून त्यांना मारण्यासाठीच त्या दोन डब्याच्या रेल्वेच्या डब्यामध्ये त्यांना बसवले होते.

ज्या दोन रेल्वेच्या डब्यामध्ये बसलेले हे गुजरातच्या अहमदाबाद मधील व्यापाऱ्यांच्या घरातील कामगार, शिपाई, ऑफिस बॉय, माळी काम करणारे कर्मचारी, ड्रायव्हर, त्यांच्या ऑफिसमध्ये,दुकानात काम करणारे कामगार या गरीब घराण्यातील 150 गरीब कामगारांना रेल्वेच्या दोन डब्यामध्ये बसवून ही रेल्वे जेव्हा गोधरा स्टेशनवर आली तेव्हा त्यांच्याच जवळच्या लोकांनी रेल्वेचे दोन डबे सर्व बाजूने बंद करून दोन रेल्वेच्या डब्यावरती पेट्रोल ओतून पेटवून देण्यात आले व ते मृत्यू झालेले सर्व डेड बॉडी अहमदाबाद मध्ये नेऊन रस्त्यावर ठेवून अहमदाबाद व गुजरात मधील सर्व लोकांना त्यांची दिशाभूल करून हे दोन रेल्वेच्या डब्यावरती मुस्लिम समाजकंटकानेच पेटवून दिले असे सांगितले.त्यामुळे आमदाबाद मध्ये सुरू झालेली दंगल पूर्ण गुजरात मध्ये पसरली, हजारो निराप्राद नागरिकांचा मृत्यू झाला.

लाखो नागरिक कायमस्वरूपी अपंग झाले हे केवळ आणि केवळ त्या वेळेला गुजरात मधील जे आता दोन व्यक्ती देश चालवत आहेत त्या दोन नेत्यांनी हे रचलेले कांड होते व हे कांड केल्याशिवाय आपल्या देशात असणारा 85 टक्के हिंदू समाज आपल्याकडे येणार याचे मनोमनी खात्री होती याची सल त्यांच्या मनात रुतत होती.दोन समाजात तेढ निर्माण केल्याशिवाय धर्मनिरपेक्ष मते आपल्याकडे वळवण्यासाठी व भविष्यकाळातील निवडणुका जिंकण्यासाठी हा एक प्रकारे रचलेला भयंकर कांड होते. हे कांड केल्यानंतरच आपण वर्चस्व निर्माण करू याचा पूर्ण अंदाज होता ते करण्यासाठीच गोधरा हत्याकांड घडवले आणि ते ठरवून केलेला प्लॅन होता हे करण्यात त्यांना यश आले.

अशीच घटना आत्ता अयोध्यात दर्शनासाठी येणाऱ्या रामभक्ता बरोबर होऊ शकेल. कारण ज्या वेळेला पुलवामा हल्ला झाला त्यावेळेला तेथील राज्यपालाना असे होणार अशी माहिती व याचा अंदाज त्यांना होता व ते तसेच झाले. गोधरा हत्याकांड प्रमाणे परत एकदा हे कांड होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, म्हणून सर्व रामभक्तांनी आपली काळजी घ्यावी अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.