Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बँकेकडून कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कर्ज कोणाला फेडावं लागत ? काय सांगतो RBI चा नियम

बँकेकडून कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कर्ज कोणाला फेडावं लागत ? काय सांगतो RBI चा नियम


आपल्यापैकी अनेक जण संसाराच्या गरजा भागवण्यासाठी कर्ज काढत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज काढले जाते. आपल्याला गरजेनुसार कर्ज मिळतं. जसं की जर घर बांधायचे असेल तर होम लोन, जर वाहन खरेदी करायची असेल तर वेहिकल लोन किंवा इतर काही वैयक्तिक कारणांसाठी लोन हवं असेल तर पर्सनल लोन मिळत

खरे तर अलीकडे बँका ग्राहकांना अल्प व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देत आहेत. यामुळे कर्ज घेणाऱ्यांची संख्या डे बाय डे वाढू लागली आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले जात आहे. दरम्यान जर तुम्हीही बँकेकडून कर्ज घेतले असेल किंवा घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.

आज आम्ही जर एखाद्या व्यक्तीने बँकेकडून कर्ज घेतले असेल आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर सदर कर्जाची परतफेड कोण करणार, यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने अर्थातच आरबीआयने कोणते नियम बनवले आहेत याबाबत महत्वाची अशी माहिती घेऊन हजर झालो आहोत. 

खरे तर कोणत्याही प्रकारचे लोन घेतले तर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला एक का विशिष्ट कर्ज कालावधीत म्हणजेच लोन टेन्युअर मध्ये कर्जाची परतफेड करणे आवश्यक असते. कर्जदार जर असे करण्यास असमर्थ ठरला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते.

पण जर कर्ज घेणाराच हयात नसेल तर अशावेळी बँकेच्या माध्यमातून काय निर्णय घेतला जातो हा मोठा सवाल आहे. दरम्यान अशा प्रसंगासाठी आरबीआय ने काही नियम तयार केले आहेत आज आपण हेच नियम जाणून घेणार आहोत.

कर्ज घेणाऱ्याचा मृत्यू झाला तर थकबाकी कोण भरणार ?

हा प्रश्न अनेक लोकांकडून विचारला जात होता. खरे तर जर कर्ज घेणाऱ्याचा मृत्यू झाला असेल तर कर्जाची परतफेड कोण करेल हे त्याच्या कर्जाच्या प्रकारावर आणि कर्जाच्या कपातींवर अवलंबून राहणार आहे. दरम्यान जर पर्सनल लोन, होम लोन, कार लोन आणि क्रेडिट कार्ड वर लोन घेतलेले असेल आणि सदर व्यक्तीचा मृत्यू झाला तर यासाठी कोणतेच नियम वा निकष नाहीत. 

यासाठी सध्या काहीही तरतूद करण्यात आलेली नाही. पण गृहकर्ज घेतले असेल तर कर्ज घेतलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याच्या वारसांना कर्जाची उर्वरित रक्कम परत करावी लागते. हा एक नियम आहे. जर तो कर्जाची परतफेड करू शकत नसेल, तर बँका मालमत्तेचा लिलाव करून कर्ज वसूल करतात.

मात्र, गृहकर्जाचा विमा उतरवला असेल तर विमा कंपनी कर्जाची रक्कम वसूल करेल. मुदतीचा विमा घेतल्यास, दाव्याची रक्कम नॉमिनीच्या खात्यात जमा होते आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होते. कायदेशीर वारसाला केवळ बाकी असलेल्या रकमेतून पैसे देण्याचा अधिकार आहे. 

कार लोन, पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड, कार लोनच्या बाबतीत बँका कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधतात. कर्जदाराचा कायदेशीर वारस कार ठेवू इच्छित असल्यास आणि थकबाकीची परतफेड करण्यास तयार असल्यास ती कार ठेवून देय रक्कम परत करू शकतो; असे न झाल्यास, बँक वाहन जप्त करू शकते आणि थकबाकी भरण्यासाठी त्याची विक्री करू शकते. 

वैयक्तिक आणि क्रेडिट कार्ड कर्ज ही अशी कर्जे आहेत ज्यांना कोणतेही तारण नसते. त्यामुळे बँक कायदेशीर वारस किंवा कुटुंबातील सदस्यांकडून थकबाकीची रक्कम वसूल करू शकत नाही; तथापि, सह-खरेदीदार त्याची परतफेड करू शकतो. असे न झाल्यास बँकेला ते NPA (नॉन परफॉर्मिंग अॅसेट) म्हणून घोषित करावे लागते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.