Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पाकीटमार कधी एकटा येत नाही, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर घणाघात

पाकीटमार कधी एकटा येत नाही, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर घणाघात

धौलपूर:  पाकीटमार कधी एकटा येत नाही. तिघेजण असतात. एक समोरून, एक मागून येतो आणि एक लांब ऊभा असतो. समोरचा तुमचे लक्ष विचलित करतो आणि मागचा खिसा कापतो, तिसरा हे सगळे बघत असतो, त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचे लक्ष भरकटवण्याचे काम करत आहेत, असा घणाघात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला.


पुढे ते म्हणाले, मोदी समोरून येतात. टीव्हीवर आपल्याशी संवाद साधतात. हिंदू-मुस्लिम, जीएसटी, नोटबंदी, मला फाशी वगैरे वक्तव्य करतात. तेवढय़ात मागून अदानी येतात. तुमचे पैसे घेऊन जातात. तिसरा माणूस म्हणजे अमित शहा, ते कुणाला हे घडलेय ते कळू नये याची काळजी घेतात. असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उद्योजक गौतम अदानी यांची तुलना पाकीटमाराशी केली.


ओबीसीवरूनही राहुल गांधी मोदींवर निशाणा साधला. निवडणुकीत मते मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला ओबीसी सांगतात. मते मिळवून झाले की, त्यांना ओबीसीचा विसर पडतो. नंतर मात्र ते हिंदुस्थानात एकच जात आहे असे सांगतात. मोदी यांचा हा दुटप्पीपणा आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.