डिसेंबरपासून राहुल गांधी यांची 'भारत जोडो' यात्रा, भोपाळमध्ये 13 नोव्हेंबरला पदयात्रा
पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, 13 नोव्हेंबरला राहुल गांधींची मध्य प्रदेशात भोपाळमध्ये पदयात्रा होणार आहे. पाच महिन्यांत लोकसभा निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा होणार आहे. भारत जोडो यात्रा 2.0 या वर्षी डिसेंबर महिन्यापासून सुरू होऊ शकते आणि फेब्रुवारी 2024ला यात्रा पूर्ण होईल, असे सांगण्यात येते. गुजरात ते अरुणाचल प्रदेश अशी ही यात्रा असेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.