अखेर मनोज जरांगे यांचे उपोषण मागे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश
मराठा आरक्षणाच्या मागणीवर सोळा दिवसांपासून ठाम असलेले मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू होते. अखेर मुख्मयंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटी येथे जात मनोज जरांगे यांचे उपोषण सोडले. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत रावसाहेब दानवे, संदीपान भुमरे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, अर्जुन खोतकर यांच्यासह सरकारचे दोन अधिकारीदेखील चर्चेसाठी उपस्थित आहेत.
मुख्यमंत्री यांच्यासोबत जरांगे पाटलांची दहा ते पंधरा मिनिटे चर्चा झाली. या चर्चेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हातून ज्यूस पिऊन जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं. जरागेंनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी सरकार आणि जरागे पाटील यांच्या शिष्टमंडळामध्ये अनेक बैठका झाल्या. अर्जुन खोतकर, गिरीश महाजन यांनीही त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती, पण जरांगे आपल्या उपोषणावर ठाम होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.