पुनर्जन्माचा दावा, 8 वर्षाच्या मुलाने दिला सगळ्याना धक्का, नेमका काय प्रकार?
चित्रपटांमध्ये पुनर्जन्माच्या घटना तुम्ही अनेकदा पाहिल्या असतील. मात्र खऱ्या आयुष्यातही अनेकांचा यावर विश्वास आहे. तर यावर विश्वास न ठेवणारेही बरेच लोक आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या मैनपुरी भागातील एका व्हायरल व्हिडिओने लोकांना आश्चर्यचकित केलं आहे.व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा दावा करतोय की, तो 8 वर्षांपूर्वी सर्पदंशामुळे मरण पावला होता. तेव्हा त्याचं नाव होतं मनोज. त्याचा स्वतःच्या मुलीच्या पोटी पुनर्जन्म झाला आहे.
ही घटना उत्तर प्रदेशातील मैनपुरी जागीरच्या रतनपूर गावातील आहे. या ठिकाणी हा मुलगा आता आपल्या आजीला बायको असल्याचं सांगतोय, तर आपल्या आईला आपली मुलगी म्हणतोय. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून लोकांच्या कुतुहलाचा विषय बनला आहे. तसंच या संपूर्ण प्रकरणावर श्रद्धा आणि अंधश्रद्धेची चर्चा सुरू झाली आहे.पुण्यात पाहा अयोध्येतील राम मंदिर 9 जानेवारी 2015 रोजी रतनपूरचे रहिवासी मनोज मिश्रा हे त्यांच्या शेतात काम करत असताना त्यांना कोब्रा साप चावला.
त्यानंतर त्यांची दृष्टी गेली. कुटुंबीयांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यावेळी त्यांची मुलगी रंजना ही गरोदर होती. मनोज मिश्रा यांचं तेरावं होण्याआधीच रंजनाने एका मुलाला जन्म दिला. त्याचं नाव ठेवण्यात आलं आर्यन.वासरू नाही, तरी 5 लिटर दूध देते गाय; गावकरी म्हणतात 'कामधेनू'आश्चर्य म्हणजे जेव्हा आर्यन त्याच्या आईसोबत मैनपुरीला आला तेव्हा त्याने त्याच्या पुनर्जन्माची कहाणी आपल्या कुटुंबीयांना सांगितली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आर्यन सांगतोय की, 'साप चावल्याने त्याचा मृत्यू झाला. यानंतर तो बेशुद्ध झाला होता.' शिवाय जेव्हा त्याने त्याच्या आजोबांच्या बँकेत जमा असलेल्या पैशांबद्दल सांगितलं तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान, या घटनेची परिसरात मोठी चर्चा आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.