Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारत मंडपम मध्ये पाणीच पाणी? 2700 कोटींच्या कामाची पोलखोल झाल्याची कॉंग्रेसची टिका

भारत मंडपम मध्ये पाणीच पाणी? 2700 कोटींच्या कामाची पोलखोल झाल्याची कॉंग्रेसची टिका 


नवी दिल्ली:  दिल्लीत G20 शिखर परिषद सुरू आहे. आज शेवटचा दिवस असून अनेक देशांचे प्रमुख संध्याकाळपर्यंत परतणार आहेत. त्यातच राजधानी दिल्लीत सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे दिल्लीतील अनेक भागात पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात दावा करण्यात आला की, पावसामुळे भारत मंडपममध्ये पाणी साचलं आहे. यावरून काँग्रेस पक्षाने सरकारवर ताशेरे ओढले आणि कोट्यवधी रुपयांच्या उधळपट्टीचे हे दृश्य असल्याचे म्हटले आहे.

G20 शिखर परिषदेसाठी उभारलेल्या भारत मंडपमचा व्हिडीओ काँग्रेसने शेअर केला. त्याला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं की, "पोकळ विकास उघड झाला. G-20 साठी भारत मंडपम तयार करण्यात आला होता. त्यासाठी गुंतवलेले 2700 कोटी रुपये एका पावसात पाणी वाहून गेले."

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.