आता फक्त 50 वर्हाडी, 10 प्रकारचे अन्न पदार्थ! लग्नातील खर्चाला लागणार लगाम ?
नवी दिल्ली: आपल्याकडे सर्वाधिक खर्च हा लग्नात केला जात असेल. अनेकजण तर कर्ज काढून लग्नाचा बार उडवतात. मात्र, लग्नात केलेला अवाढव्य खर्च न फेडू शकल्याने कर्जबाजारी झालेल्यांचीही कमी नाही. लग्नातील अनावश्यक खर्चाला आळा घालण्यासाठी सरकार पाऊल उचलू शकतं. काँग्रेसच्या एका खासदाराने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात एक विधेयक मांडले आहे, ज्यामध्ये लग्नांमध्ये होणाऱ्या खर्चावर आळा घालण्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे खासदार जसबीर सिंग गिल यांनी शुक्रवारी लोकसभेत मांडलेल्या खासगी सदस्य विधेयकानुसार, मिरवणुकीत केवळ 50 लोकांनाच सहभागी होता येणार आहे. तसेच, या अंतर्गत, लग्नात 10 पेक्षा जास्त पदार्थ दिले जाऊ शकत नाहीत.
2500 रुपयांपेक्षा जास्त रक्कम शगुन किंवा भेट म्हणून देता येणार नाही, अशी तरतूद आहे.काँग्रेस खासदार जसबीर सिंग गिल यांनी 4 ऑगस्ट रोजी लोकसभेत 'विशेष प्रसंगांवर उधळपट्टी प्रतिबंधक विधेयक 2020' सादर केले. त्यांनी संसदेत सांगितले की, "वंचित आणि निराधारांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने लग्न आणि सण यांसारख्या विशेष प्रसंगी होणार्या फालतू खर्चाला आळा घालण्याचे या विधेयकाचे उद्दिष्ट आहे. विधेयकातील महत्त्वाच्या तरतुदींवर प्रकाश टाकणाऱ्या ट्विटमध्ये, काँग्रेस खासदार म्हणाले की ते एका वऱ्हाडात उपस्थित असलेल्या लोकांची संख्या मर्यादित करते, कमाल मर्यादेत 50 लोक आहेत.शगुनमध्येही कपात करण्याची तरतूदविधेयकात अशा प्रसंगी दिल्या जाणार्या पक्वानाच्या संख्येवर 10 डिशेसची मर्यादा ठेवण्याचाही प्रस्ताव आहे. विधेयकाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 'शगुन' किंवा विशेष प्रसंगी देवाणघेवाण केलेल्या भेटवस्तूंचे मूल्य 2,500 रुपयांच्या मर्यादेवर केंद्रित करणे.
याशिवाय, प्रस्तावित कायदा लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी आणि स्त्री भ्रूणहत्येच्या समस्येला तोंड देण्यासाठी सकारात्मक योगदान देण्याचा प्रयत्न करतो. देशात वेगळ्या प्रकारची भारत छोडो यात्रा, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोलमहागड्या लग्नांमुळे कर्जबाजारीपंजाबच्या खादूर साहिबच्या खासदाराने वधूच्या कुटुंबावर आर्थिक भार टाकणाऱ्या भव्य विवाहांची संस्कृती संपवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, खासदार म्हणाले की, लोकांनी विवाहासाठी संपत्ती विकणे किंवा लग्नातील फालतू खर्चामुळे अनेकजण कर्जबाजारी झाल्याची उदाहपणे समाजात पाहायला मिळतात. या विधेयकाच्या माध्यमातून स्त्री भ्रूण हत्या आणि मुलगी ओझ म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन बदलायचा आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.