Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोदींच्या अहमदाबाद मधील हॉटेलमधील किमती वाढल्या!एका रात्रीचे भाडे जाणून घ्या....

मोदींच्या अहमदाबाद मधील  हॉटेलमधील किमती वाढल्या!एका रात्रीचे भाडे जाणून घ्या....


आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चे वेळापत्रक येताच मोदींच्या अहमदाबादमधील हॉटेल रूमच्या किंमती गगनाला भिडल्या. अहमदाबादमधील हॉटेलच्या खोलीचे भाडे इतके वाढले आहे, की ऐकून सर्वांनाच धक्का आयसीसी 2023 एकदिवसीय विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि अंतिम सामना 19 नोव्हेंबरला खेळल्या जाणार आहे. 

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 15 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महान सामना रंगणार आहे. आयसीसी 2023 एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामनाही नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. क्रिकेट विश्वचषक 2023चे वेळापत्रक येताच अचानक अहमदाबादमधील हॉटेलच्या खोलीचे भाडे गगनाला भिडले. विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आणि अंतिम सामन्याचे आयोजन यामुळे अहमदाबादच्या हॉटेल्समध्ये बुकिंग सुरू झाले आहे. विश्वचषक 2023 सुरू होण्यासाठी अजून 4 महिने बाकी आहेत. 

विश्वचषक 2023 दरम्यान देश-विदेशातील लोक क्रिकेट पाहण्यासाठी अहमदाबादमध्ये येतील, अशा परिस्थितीत येथील अनेक हॉटेल्सचे एका रात्रीचे भाडे 50 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. सामान्य दिवसांमध्ये, या खोल्यांची किंमत प्रति रात्र 6,500 ते 10,500 रुपयांपर्यंत असते. या स्पर्धेची सुरुवात अहमदाबादमध्येच 5 ऑक्टोबरला मागील विजेते इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होईल. नरेंद्र मोदी स्टेडियम हे प्रेक्षकांच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे, जे 132000 प्रेक्षक बसू शकतात, जे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड 
पेक्षा 32000 जास्त आहे.

विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आणि दुसरा सामना दुसऱ्या दिवशी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. दोन्ही उपांत्य फेरीत राखीव दिवस असेल. अंतिम सामना अहमदाबादमध्ये 19 नोव्हेंबरला होईल तर 20 नोव्हेंबर हा राखीव दिवस असेल. यजमान भारत 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे पाच वेळा विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता येथे वर्ल्डकपचे सामने होणार आहेत. गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम व्यतिरिक्त हैदराबादमध्ये 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान सराव सामने खेळवले जातील. 2011 च्या विश्वचषकाचा अंतिम सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. जिथे भारताने 28 वर्षांनी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले. त्याच वेळी 1987 च्या विश्वचषकाचा अंतिम सामना ईडन गार्डन्सवर खेळला गेला ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पराभूत केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.