महाराष्ट्राच्या प्रगतीत पंतगरावांचे योगदान लक्षवेधी..! -- रावसाहेब पाटील
सांगली: भारती विद्यापीठाचे शिल्पकार स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी बहुजन समाज शिक्षणाचे मोठे कार्य उभे केले आहे त्याचबरोबर राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचा मंत्री म्हणून असंख्य विकास कामे केली आहेत. भारती परिवारातून उभे राहिलेले आरोग्य, शैक्षणिक,सहकार, बँकींग, क्रिडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याने महाराष्ट्र समृद्ध झाला आहे. त्याची नोंद राज्याच्या विकासपर्वात करावीच लागते असे भावपूर्ण उद्गार तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन रावसाहेब जिनगोंडा पाटील अण्णा यांनी काढले. डॉ. पतंगराव कदम यांच्या पुण्यतिथीनिमित्त तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीने संस्थेच्या प्रांगणात डॉ.शिवाजीराव कदम काॅलेज आँफ फार्मसी व महावीर स्टेट अकॅडमीची इंग्रजी माध्यम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. अशोक सकळे,संचालक लालासो थोटे व एस. पी. मगदूम वकील, डॉ. शिवाजीराव कदम फार्मसी काॅलेजचे प्राचार्य डीडी चौगुले व महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ कोल्हापूर विभागाचे सेक्रेटरी प्रा. एन.डी.बिरनाळे इ. नी. दीपप्रज्वलन करून डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.