भाचीच्या लग्नात मामांनी खर्च केले 3 कोटी रुपये!
भाचा-भाची ही प्रत्येक मामाचे लाडके असतातच. त्यांना काय हवं नको ते घेऊन देण्यासाठी मामा सढळ हाताने पैसै खर्च करतो. मात्र राजस्थान मध्ये दोन मामांनी भाचीच्या लग्नात पैशाचा पाऊस पाडला. आपल्या लाडक्या भाचीच्या लग्नान या मांमानी थोडे थोडके नव्हे तर चक्क खर्च केले 3 कोटी रुपये खर्चे केले. संपुर्ण देशभरात या लग्नाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. बघुया हे प्रकरण नेमकं कुठलं आहे.
राजस्थानमधील लग्न चर्चेचा विषय
हे महागडं लग्न राजस्थान मध्ये पारं पडलं आहे. येथे राहणारे घेवरी देवी आणि भंवरलाल पोतलिया यांची मुलगी अनुष्का यांचे बुधवारी लग्न झाले.यादरम्यान अनुष्काचे आजोबा भंवरलाल गरवा यांच्या तीन मुले हरेंद्र, रामेश्वर आणि राजेंद्र यांच्यासह कोट्यवधी रुपये लग्नात दिले. अनुष्काला 81 लाख रुपये रोख, नागौरमधील रिंग रोडवर 30 लाखांचा प्लॉट, 16 एकर जमीन, 41 तोळे सोने, 3 किलो चांदी, धानाने भरलेली नवीन ट्रॅक्टर-ट्रॉली आणि एक स्कूटी दिली आहे.
बहिणीच्या मुलांच्या लग्नात भावांनी केला भरमसाठ खर्च
खरे तर राजस्थानमध्ये बहिणीच्या मुलांच्या लग्नात मातृपक्षाकडून मायरा भरण्याची प्रथा आहे. सर्वसाधारणपणे याला भात भरणे असेही म्हणतात. या विधीमध्ये मातृपक्षाकडून बहिणीच्या मुलांना कपडे, दागिने, पैसे आणि इतर वस्तू दिल्या जातात. यामध्ये बहिणीच्या सासरच्या मंडळींसाठी कपडे आणि दागिनेही दिले जातात.
पैशांनी भरलेली थाळी घेऊन आजोबा आले नातीकडे
देवीचे वडील स्वत: डोक्यावर पैशाने भरलेले ताट घेऊन मंडपात पोहोचले. ताटात 81 लाख रुपये रोख, त्यांच्या मुलीसाठी 500 रुपयांनी सजवलेले कव्हरही होते. नागौर शहरातील रिंगरोडच्या वरती 16 बिघा शेतीसाठी 30 लाखांचा प्लॉट, 41 तोळे सोने व 3 किलो चांदीचे दागिने देण्यात आले. याशिवाय नवीन ट्रॅक्टर ट्रॉली आणि धान्याच्या गोण्यांनी भरलेली स्कूटी अशा अनेक भेटवस्तू देण्यात आल्या. ही मायरा चर्चेचा विषय ठरली. समाज व पंच-पटेल यांच्या उपस्थितीत जमिनीची सर्व कागदपत्रे मुलीच्या कुटुंबीयांना माहेरी देण्यात आली.
नागौरच्या मायराचा अर्थ नागौरच्या मायराकडे अत्यंत आदराने पाहिले जाते. मुघल राजवटीत ख्याला आणि जयलच्या जाटांनी भरलेल्या मायराबद्दल स्त्रिया लिच्छमा गुजरीला आपली बहीण मानून लोकगीते गात असत, असे वडील सांगतात. असे म्हणतात की येथे धर्माराम जाट आणि गोपालराम जाट हे मुघल राजवटीत बादशाहासाठी कर गोळा करायचे आणि दिल्ली दरबारात नेऊन गोळा करायचे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.