"मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले", गृहमंत्री अमित शाह यांचा घणाघात.
पुणे: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरी शिवसेना म्हणून घोषित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी स्वागत केले आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे दूध का दूध आणि पानी का पाणी झाले आहे, असे शहा यांनी शनिवारी सांगितले. ‘Modi@20’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता शाह यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपद वाटप करण्याबाबत कोणताही करार झाला नसल्याचा पुनरुच्चार केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने भारतीय जनता पक्ष (भाजप) सोबतची युती तोडली आहे.
EC ने केले दूध का दूध आणि पानी का पानी : शहा
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शहा म्हणाले, ‘काल निवडणूक आयोगाने ‘दूध का दूध, पानी का पानी’ केले आहे. कालच ‘सत्यमेव जयते’चा फॉर्म्युला लागू झाला आहे. ठाकरे यांचे नाव न घेता शहा म्हणाले, जे खोट्याचा आधार घेऊन ओरडायचे, त्यांना आज सत्य कोणाच्या बाजूने आहे ते कळले आहे.
ते पुढे म्हणाले,’स्वतःच्या फोटोपेक्षा मोदींचा मोठा फोटो लावून त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या. देवेंद्रजींना नेता मानून निवडणूक लढली त्यानंतर मुख्यमंत्री हे पद मिळावं म्हणून विरोधी विचारधारेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तळवे चाटले. त्यांना आज सत्य काय आहे समजलं आहे’ असं म्हणत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली.
शहा यांनी ओंकारेश्वर मंदिरात पूजा केली
निवडणूक आयोगाने शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘शिवसेना’ नाव आणि त्याचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ वाटप केले. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पुण्यात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अमित शहा यांनी ओंकारेश्वर मंदिरात पूजा केली. पुण्यातील महात्मा फुले संग्रहालयात त्यांनी भाजपचे आजारी खासदार गिरीश बापट यांचीही भेट घेतली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.