अनैतिक संबंधातून खंडणीसाठी अपहरण केलेल्या बालकाची सुटका...
सांगली : उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुगर् पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अनैतिक संबंधातून अपहरण केलेल्या चार वषार्च्या बालकाची सुटका करण्यात सांगली पोलिसांसह उस्मानाबाद पोलिसांच्या संयुक्त पथकाला यश मिळाले. याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील एकासह हरिपूर (ता. मिरज, जि. सांगली), सांगली शहरातील रामनगर येथील एक अशा तिघांना अटक करून बालकाची सुटका करण्यात पोलिसांना यश मिळाले.
किरण अविनाश लाडे (रा. सलोळे, जि. सोलापूर), किशोर शाहीर तांदळे (रा. हरिपूर, जि. सांगली), सुनील सदाशिव हजारे (रा. रामनगर, सहावी गल्ली, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पीडित मुलाच्या आईशी लाडे याचे अनैतिक संबंध होते. ती सध्या प्रतिसाद देत नसल्याने तिला धडा शिकवण्यासाठी लाडे याने तांदळे याला हाताशी धरून तिच्या मुलाच्या अपहरणाचा कट रचला. मंगळवारी सकाळी पीडित मुलाची आई मुलासह एका लग्न समारंभासाठी नळदुगर् पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेली होती. त्यावेळी लाडे आणि तांदळे यांनी मिळून तिच्या मुलाचे अपहरण केले. त्यानंतर तांदळे पीडित मुलाला घेऊन सांगलीला आला.
याबाबत नळदुगर् पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तेथील पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान संशयित तांदळे याने पीडित मुलाची आई आणि वडिलांना एका वेगळ्यात मोबाईल क्रमांकावरून फोन करून मुलाच्या बदल्यात दोन लाख रूपये खंडणीची मागणी केली. त्याद्वारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तांदळे याने सांगलीत आल्यानंतर पीडित मुलाला हजारे याच्या घरी ठेवले होते. उस्मानाबाद पोलिसांचे पथक सांगलीत आल्यानंतर सांगली पोलिसांच्या मदतीने हजारे याच्या घरावर छापा टाकून मुलाची सुटका करण्यात आली. तर तांदळे, हजारे यांच्यासह लाडे यालाही अटक करण्यात आली. सांगली शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख, उस्मानाबाद पोलिसांचे पथक तसेच सांगली शहरकडील गुन्हे शोध पथकाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.