अश्रूंची कहाणी
डोळ्यामधूल्या अश्रूंनी ,दुस-याला विचाराले 'ऐ का,रे आपण असे ??
ना रंग, ना रूप
नेहमीच मात्र चिडीचूप
आनंद झाला तरी दु:खातून बाहेर
दु:खाच्या प्रसंगीही
दुराव्यांचा आहेर ,
कोणीच कसे थांबवत नाही
आपल्याला किनाराही साधा नाही ,
या पापण्यांना ,
दुसर्यालाही जरा मग प्रश्न पडला .
खुप विचार करून मग तोही बोलला.
रंग -रूप नसला तरीही ,
चिडीचूप असलो जरीही
आधार ठेवता भावनांचा ,
आदर राखतो वचनांचा ,
सात्वनांचे बोल आपणच
अंतरीही खोल आपणच ...
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्व ,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच
मात्र महत्त्व ...
आपल्याला कोणी नाही थांबवू शकत
बंधनात नाही कोणी बांधू शकत...
उदेक आपल्या मनातील वेदनांचा
नाजुक धागा वचनांतील बंधनाचा.
भावबंध हृदयातील स्पंदनांचा ,
स्वरबद्ध झंकार,तनातील स्पंदनाचा
म्हणूनच आपले बाहेर पडने ,
भाग आहे .आल्यामुळेच आज
हे जग उभे आहे .
अशीच आपली ही कहाणी
ऐकून अश्रूंची हि वाणी ...
अउश्रूंच्याच डोळ्यात ,,
हळुच ,अलगद आले पाणी....!!
!! जय जिजाऊ !!
शिवमती :- ज्योति नितीन चव्हाण
जिजाऊ ब्रिगेड:- कोषाध्यक्ष सांगली
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.