Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली आहे.

सांगली जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली आहे. 


सांगली जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली आहे. जत तालुक्यातील बिळुर येथील तलावात पडून आईसह तीन मुलींचा दुर्देवी मृत्यू झालाय. या घटनेने बिळूर आणि जत तालुक्यात शोककळा पसरली आहे. हा अपघात आहे की घातपात? हे अद्यापही समजलेलं नाही. सुनीता माळी (वय 30), अमृता माळी (वय 13), अश्विनी माळी (वय 10), ऐश्वर्या माळी (वय 7) असं मृत्युमुखी पडलेल्या माय-लेकींची नावे आहेत. रविवारी रात्री उशीरा या चौघांचेही मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, जत तालुक्यातील बिळुर येथील सुनीता माळी या कपडे धुण्यासाठी मुलींसह गावाजवळील तलाव परिसरात गेल्या होत्या. रविवारी रात्री या चौघींचेही मृतदेह तलावाच्या पाण्यात आढळून आले. दरम्यान, गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आईसह तीन मुलींचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आले असून हा अपघात आहे की घातपात याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.