रायगडनंतर मुंबई अलर्टवर! दिली २६/११ हल्ल्याची धमकी, पोलिसांना आला मेसेज
मुंबई : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर इथं दोन संशयास्पद बोट आढळून आल्यानंतर आता राज्यासाठी आणखी एक धोकादायक बातमी समोर आली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुमला भारताबाहेरच्या एका नंबरवरून दहशतवादी हल्ला होण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई सध्या अलर्ट मोडवर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईवर २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी या मेसेजद्वारे करण्यात आली आहे.
त्यामुळे संपूर्ण पोलीस विभागात यामुळे खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई पोलिसांना ही धमकी देण्यात आली आहे. भारताबाहेरच्या नंबरवरून हे मेसेज मुंबई पोलिसांना पाठवण्यात आले आहेत. या नंबरला ट्रॅक करण्यात येत असून यामुळे संपूर्ण पोलीस विभाग अलर्टवर आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.