हिंदू एकता आंदोलन चा पण एक काळ होता.
हिंदू एकता आंदोलन चा पण एक काळ होता. धगधगता. अनेक कारणांमुळं ही धग काहीशी कमी झाली असली तरी ती विझली नाही याचा अनुभव मी 22-23 वर्षांनी पुन्हा घेतला. निमीत्त होतं हिंदू एकता आंदोलनचे संस्थापक नारायणराव कदम यांच्यावर मी लिहीलेल्या बायोग्राफीच्या प्रकाशन समारंभाचं.
धुळ्यापासून बेळगावपर्यंत आणि कराडपासून कोल्हापूरपर्यंतच्या भागातले अनेक निष्ठावान कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी आवर्जुन उपस्थित राहिले होते. पुस्तक लिहीताना ज्या नावांचं कर्तुत्व मी ऐकलं होतं ती माणसं आज प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. त्यांच्या शाबासकीनं माझी जिंदगी रिचार्ज झाली.
ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. जिल्हा व सत्र न्यायाधिश राणी कदम, बिपीन कदम, अॅड. विजयकुमार सकळे, गौतमभाऊ पाटील, विजय कडणे आणि सुचेता माई या सार्यांच्या सहकार्यामुळं अजून एक मस्त पुस्तक मी लिहू शकलो. या सार्यांना आणि हिंदू एकताच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना दिलसे धन्यवाद.
नंदू गुरव. सांगली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.