डॉ.नरेंद्र दाभोलकर
काय गुन्हा होता त्यांचा ?
तर जनतेला शहाणं करणे, त्यांना अंधश्रध्दांच्या जोखडातून बाहेर काढणे. यासाठी त्यांना आपला जीव गमवावा लागला.
पण जनता शहाणी झाली का ? तर नाही.
इथली व्यवस्था जनतेला शहाणी होऊ देत नाही. त्यामुळं जनतेनेही ठरवलंय आपण शहाणं व्हायचं नाही. 'ठेविले अनंते तैसेचि रहावे' या उक्ती प्रमाणे राहायचं.
पण दाभोलकरांच्या बलिदाना नंतर सरकारने जादूटोणा विरोधी कायदा केला. यामुळं समाजातील अंधश्रद्धांचं निर्मूलन झालं का ? तर नाही. उलट फोफावत चाललीय. कारण राज्यकर्त्यांची इच्छाशक्तीच नाही. समाजहिताचा बळी दिला तरी चालेल,पण आमच्या मतपेटीला धक्का लागता कामा नये,हे त्यांचे धोरण. काही मोजके विचारवंत ,साहित्यिक सोडले तर बाकीचे बोटचेपी भूमिका घेतात.
वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारा, अंगिकारा,हे भारतीय राज्यघटनेत सांगितलंय. त्यासाठी समाजानेच उचल खाल्ली पाहिजे, हीच डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना आदरांजली ठरेल......!
Adv.Kiran Kadam.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.