Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चौघे मित्र एकाच गाडी वरुण जाताना भीषण अपघातात तीन मित्र ठार तर एक गभीर

 चौघे मित्र एकाच गाडी वरुण जाताना भीषण अपघातात तीन मित्र ठार तर एक गभीर


सांगली : दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये तीन जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जत तालुक्यातील कोसारी इथं हा अपघात झाला आहे. चौघे मित्र एकाच मोटरसायकलवरून जतहून कोसारीकडे येताना हा दुर्दैवी अपघात घडला आहे.अजित नेताजी भोसले, मोहित शिवाजी तोरवे आणि राजेंद्र भाले अशी ठार झालेल्या मित्रांची नावं आहेत. तर संग्राम विक्रम तोरवे हा जखमी आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कोसारी येथील अजित भोसले व त्याचे मित्र एकाच मोटरसायकलवर चौघे जण शनिवारी जतला गेले होते.हे चौघे रात्री उशिरा गावाकडे परतत होते.

दरम्यान, या झालेल्या अपघातात तिघे ठार झाले आहेत. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. विजयपुर गुहागर राष्ट्रीय महामार्गवरील बिरनाळ नजीक असणाऱ्या धोकादायक वळणावर ओढा पात्रानजीक मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने गाडी घसरून हा अपघात झाला. ज्यामध्ये अजित भोसले हा जागीच ठार झाला तर जखमी मोहित तोरवे, राजेंद्र भाले, संग्राम तोरवे या तिघांना बिरनाळ येथील ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, यातील गंभीर जखम झालेले मोहित शिवाजी तोरवे (वय २१), राजेंद्र भाले (वय २२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर संग्राम विक्रम तोरवे ( वय-१६) याच्यावर उपचार सुरू आहेत .एकाच वेळी तिघा मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याने कोसारी गावावर शोककळा पसरली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.