Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जन सामान्यामध्ये चैतन्य निर्माण करणारा नेता म्हणजे राजीवजी गांधी - आदिनाथ मगदूम

 जन सामान्यामध्ये चैतन्य निर्माण करणारा नेता म्हणजे राजीवजी गांधी - आदिनाथ मगदूम


पंचायत राजच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये ग्रामसभेच्या माध्यमातून जनसामान्यमध्ये चैतन्य करणारा नेता म्हणजे स्व. पंतप्रधान भारतरत्न राजीवजी गांधी असे उद्गार आज कॉंग्रेस भवन सांगली येथे आदिनाथ मगदूम माजी संचालक वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना, सांगली यांनी काढले.

सांगली जिल्हा काँग्रेस, शहर जिल्हा काँग्रेस व काँग्रेस सेवादलाचे वतीने भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित आला. यावेळी स्वागत प्रास्ताविक सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी केले. राजीवजी गांधी यांनी आपल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये युवकांचे साठी सर्वसामान्य तळागाळातील लोकांसाठी अनेक योजना राबविल्या. इंदिराजींच्या बलिदानानंतर देशभर सहानुभूतीची लाट नेहरू घराण्याची जनमान्यता आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व यामुळे ते सर्व थरातील लोकांचे आकर्षण स्थान व आशा स्थान बनले होते.

देशाचे प्रश्न सोडविण्याच्या बाबतीत प्रशंसनीय कार्य केले. सर्व प्रातांतील सर्व धर्म जातीतील, सर्व वर्गातील लोकांना इतर कोणत्याही नेत्यापेक्षा आपुलकी वाटावी असे राजीवजींचे नेतृत्व होते. 21 व्या शतकातील अत्यंत अभ्यासू व भारताला आधुनिकतेकडे नेणारा नेता होता असे सांगितले. अमित पारेकर यांनी राजीवजी गांधी यांचे जीवनावर आपले मनोगत व्यक्त करुन कॉंग्रेस पक्ष बळकटीसाठी येणाऱ्या काळात सभासद नोंदणी वाढवून जनतेपर्यंत आपण पोहोचले पाहिजे असे सांगितले.

यावेळी दत्तात्रय मुळीक, बाबगोंडा पाटील, विठ्ठलराव काळे अमित पारेकर, श्रीधर बारटक्के, सुभाष पट्टणशेट्टी, दत्तात्रय चोरमुले, प्रफुल शेट्टी, पंडित पवार भिमराव चौगुले, लालसाब तांबोळी, सचिन पाटील, उज्वल वाघमारे जन्नत नायकवडी, शमशाद नायकवडी,जुबेदा बिजली, संजीवनी पाटील, सुनिता मदने, शोभा कोल्हे,जुलेखा मुजावर, मुनिरा पटेल, वैभव थिटे, सुशांत जाधव,मौलाली वंटमोरे, विश्वासराव यादव, अरुण धोत्रे माजी जिल्हा परिषद सदस्य,संगाप्पा पाटोळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.