Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

समाज कल्याण क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था व समाज सेवकांनी विविध पुरस्कारासाठी 15 मे पर्यंत अर्ज करावेत - सहायक आयुक्त जयंत चाचरकर

समाज कल्याण क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था व समाज सेवकांनी  विविध पुरस्कारासाठी 15 मे  पर्यंत अर्ज करावेत - सहायक आयुक्त जयंत चाचरकर


सांगली दि. 13 : समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाज सेवक यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2019-2020,2020-2021 व 2021-2022 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तथापि सन 2019-2020 या कालावधीत ज्या अर्जदारांनी अर्ज केला आहे. त्यांनी त्या कालावधीसाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तरी संबंधीतांनी दिनांक 15 मे 2022 पर्यंत पुरस्कारासाठी अर्ज करावेत असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण जयंत चाचरकर यांनी केले आहे. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार या पुरस्कारासाठी अ) व्यक्तींकरिता वयाची अट पुरुषांसाठी ५० वर्षे आणि महिलांसाठी ४० वर्षे आहे. आ) या पुरस्कारासाठी संस्थांच्या बाबतीत-या संस्था संस्था ही मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० व संस्था नोंदणी अधिनियम, १८६० अंतर्गत नोंदणीकृत असाव्यात. आणि या संस्था राजकरणापासून अलिप्त असाव्यात. २. वरील सर्व पुरस्कारांसाठी शिफारशींच्या पद्धती पुढील प्रमाणे आहेत: अ) व्यक्तीचे संपूर्ण जीवन चरित्र आ) विनादुराचार प्रमाणपत्र इ) गैर वर्तनाबाबत खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र ई) सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र उ) संस्था व व्यक्ती यांनी केलेल्या विशेष कार्याचा तपशील आवश्यक आहे. 

पुरस्कारासाठी नाव - डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार पुरस्काराचे स्वरूप -   51 व्यक्तींना रु. 15 हजार (धनाकर्ष) व 10 संस्थांना रु.25 हजार (धनाकर्ष)‍ पुरस्कारासाठी निवडीचे निकष (व्यक्ती)- अनुसूचित जाती, विमुक्त जाती,भटक्या जमाती,  दिव्यांग कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याचा 15 वर्षांचा अनुभव पुरस्कारासाठी निवडीचे निकष (संस्था) - संस्थेमध्ये कोणताही गैरव्यवहार नसावा.  संस्थेचे समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आवश्यक. मागील ५ वर्षाचे लेखा परीक्षण अहवाल आवश्यक

पुरस्कारासाठी नाव - साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे पुरस्कार पुरस्काराचे स्वरूप - 25 व्यक्तींना रु. 25 हजार (धनाकर्ष) व 6 संस्थांना रु.50 हजार (धनाकर्ष)‍ पुरस्कारासाठी निवडीचे निकष (व्यक्ती)- 1) मातंग समाजाकरिता कला,साहित्य शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे नामवंत कलावंत साहित्यिक व समाजसेवक असावेत. 2) सामाजिक क्षेत्रात १० वर्षे कार्य केलेले असावे. 3) व्यक्ती व संस्थेस एकापेक्षा अधिक वेळेस पुरस्कारास पात्र समजण्यात येणार नाही. 4) महिलांसाठी ३० टक्केपर्यंत असाव्यात.5) पुरस्कारासाठी फक्त मातंग समाजातील कलावंत व साहित्यिक व समाज सेवक यांचा विचार केला जाईल. पुरस्कारासाठी निवडीचे निकष (संस्था) - 1) समाज कल्याण क्षेत्रात मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अंधश्रद्धा निर्मूलन, जनजागृती इत्यादी क्षेत्रात कार्य करणारी संस्था 2) मातंग समाजाच्या कल्याणासाठी १० वर्षांहून अधिक मौलिक काम असावे 3) मातंग समाज सेवा व विकास या क्षेत्रात काम पाहून पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल.

पुरस्कारासाठी नाव - पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार पुरस्काराचे स्वरूप - एका व्यक्तीला रु.२१ हजार (धनाकर्ष) व  1 संस्थेला रु.30 हजार (धनाकर्ष)‍ पुरस्कारासाठी निवडीचे निकष (व्यक्ती)- 1)  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील भूमिहीन, शेतमजूर, व दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी झटणारे नामवंत समाज सेवक असावेत 2)  सामाजिक क्षेत्रात कमीत कमी १५ वर्षे कार्य केलेले असावे. 3)  एका व्यक्तीस एकापेक्षा जास्त पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही.4) हा पुरस्कार मिळण्यास जात, धर्म, लिंग, क्षेत्र ह्या गोष्टीचा विचार केला जाणार नाही. पुरस्कारासाठी निवडीचे निकष (संस्था) - 1) समाज कल्याण क्षेत्रात व अनु.जाती व नवबौद्ध समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अन्याय निर्मूलन, अंधश्रद्धा रूढी निर्मूलन, जनजागृती भूमिहीन शेतमजर यांचे कल्याण इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना हा पुरस्कार दिला जाईल. 2) समाज कल्याण क्षेत्रात १० वर्षे कार्य असावे. विशेष मौलिक व भरीव कामकरणाऱ्या संस्थेच्या बाबतीत अट शिथिल करण्यात येईल.

पुरस्कारासाठी नाव - संत रविदास पुरस्कार पुरस्काराचे स्वरूप - एका व्यक्तीला २१ हजार (धनाकर्ष) व 1 संस्थेला 30 हजार (धनाकर्ष)‍ पुरस्कारासाठी निवडीचे निकष (व्यक्ती)- 1) चर्मकार समाजाच्या कल्याणासाठी झटणारे नामवंत समाज सेवक असावेत.2) सामाजिक क्षेत्रात कमीत कमी १५ वर्षे कार्य केलेले असावे.3) एका व्यक्तीस एकापेक्षा जास्त पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही.4) लोकनियुक्त प्रतिनिधी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत. 

पुरस्कारासाठी निवडीचे निकष (संस्था) - 1) समाज कल्याण क्षेत्रात चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य,अन्याय निर्मूलन, अंधश्रद्धा रूढी निर्मूलन, जनजागृती इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना हा पुरस्कार दिला जाईल. 2) समाज कल्याण क्षेत्रात १० वर्षे कार्य असावे. विशेष मौलिक व भरीव कामकरणाऱ्या संस्थेच्या बाबतीत अट शिथिलक्षम राहील.

पुरस्कारासाठी नाव - शाहू, फुले आंबेडकर पारितोषिक पुरस्कारांची संख्या संस्था - एकूण १२ पुरस्कार सहा महसूल विभागातील प्रत्येकी दोन प्रमाणे १२ संस्था पुरस्काराचे स्वरूप (शासकीय अशासकीय संस्था) - 7 लाख 50 हजार (धनाकर्ष) सन्मानपत्र.मानपत्रासाठी चांदीचा स्क्रोल स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ पुरस्कारासाठी निवडीचे निकष (संस्था) - १) राज्य शासनाच्या Rules of Business अनुसार हा विभाग कार्यरत असला पाहिजे. २) संस्थेने समाजातील अतिशय दुर्बल व मागासवर्गीय घटकातील व्यक्ती व समाजासाठी सेवा, शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन,रोजगार अशा व यासारख्या व्यक्तिगत व सामूहिक क्षेत्रामध्ये एकमेव अव्दितीय कार्य केलेले असले पाहिजे. ३) सदर संस्था संबंधित क्षेत्रात किमान मागील १० वर्षापासून कार्यरत असणे आवश्यक आहे. ४) संबंधित संस्था ही मुंबई विश्वस्त नोंदणी अधिनियम १९५० व संस्था नोंदणी अधिनियम १८६० अन्वये नोंदणीकृत असावी. ५) संस्थेची आर्थिक स्थिती वळकट असली पाहिजे. ६) संबंधीत संस्थेविरुद्ध किंवा पदाधिकाऱ्यां विरुद्ध फौजदारी गुन्हा किंवा दंडात्मक कार्यवाही झालेली नसावी.

पुरस्कारासाठी नाव - डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार पुरस्कारांची संख्या संस्था - राज्य स्तर-३ विभागीय स्तर ( महसूल विभागात प्रत्येकी 3 याप्रमाणे 18 पुरस्कार पुरस्काराचे स्वरूप (शासकीय अशासकीय संस्था) - राज्यस्तरीय पुरस्कार प्रथम पुरस्कार ५ लक्ष, व्दितीय पुरस्कार ३ लक्ष ,तृतीय पुरस्कार २ लक्ष,  प्रत्येक प्रवर्गामधून उत्कृष्ट ठरलेल्या संस्थेस 1 लक्ष पारितोषिक देण्यात येते. पुरस्कारासाठी निवडीचे निकष (संस्था) - १) अ)अनुसूचित जातीच्या मुलां-मुलींसाठी शासकीय वसतीगृहे. विभागीय स्तर  ब) अनुसूचित जातीच्या मुलांमुलींसाठी निवासी शाळा/आश्रमशाळा (क) अनुसूचित जातीच्या मुलांमुलींची अनुदानित वसतिगृहे २) प्रत्येक स्तरावर समितीने दिलेला निर्णय हा अंतिम राहील.  ३) संस्थांची तपासणी करून समितीमार्फत अंतिम निर्णय घेण्यात येईल. ४) पुरस्कारासाठी अंतिम निवडीच्या वेळी जर दोन्ही संस्थांना समान गुण मिळाल्यास चिठ्ठी पद्धतीने संस्थेची निवड करण्यात येईल. ५) प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवणारी संस्था ५ वर्षे कालावधीपर्यंत पुन्हा पुरस्कारासाठी पात्र असणार नाही. ६) ज्या संस्थेविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल झाले असतील किंवा शासकीय अनुदानाचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले असेल अशा संस्था पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही. ७) कोणतीही संस्था एकाच वेळी दोन पारितोषिके मिळविण्यास पात्र असणार नाही.

इच्छुक स्वयंसेवी संस्था व व्यक्ती यांनी पुरस्कारासाठी त्यांचे विहित नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण सांगली यांचेकडे दिनांक 15 मे 2022  पर्यंत सर्व नमूद कागदपत्रांसह दाखल करावेत. अर्जाचा नमुना सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, संभाजीनगर, सांगली येथे उपलब्ध आहे. सदर पुरस्काराची जाहिरात शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.