विजेच्या तारेवर रथ आदळला, शॉक लागून ११ जणांचा मृत्यू
तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. येथे रथोत्सवादरम्यान एका रथाची विद्युत तारेवर धडक झाली. विजेचा धक्का लागून मृतांची संख्या ११ वर पोहोचली आहे.जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही वार्षिक रथयात्रा तामिळनाडूमध्ये काढली जाते, ज्यामध्ये मोठी गर्दी जमते.
व्ही बालकृष्णन (पोलीस महानिरीक्षक, सेंट्रल झोन, तिरुचिरापल्ली) म्हणाले, तंजावर जिल्ह्यात रथ थेट वायरच्या संपर्कात आल्याने आतापर्यंत १० लोकांचा मृत्यू झाला आहे आणि १५ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांपासून हा कार्यक्रम होऊ शकला नव्हता. मात्र यंदा या कार्यक्रमाला परवानगी मिळाल्याने भाविकांमध्ये उत्साह होता आणि मोठी गर्दी जमा झाली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली होती, ती अपुरी ठरली. या रथयात्रेची सुरुवात ५ एप्रिल रोजी कोडियतराम (ध्वजारोहण समारंभ) ने उत्सवाने होते आणि शेवट श्री मीनाक्षी पट्टाभिषेकम (मीनाक्षी देवीचा राज्याभिषेक)ने केला जातो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.