Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता ‘या’ पद्धतीने लग्न करा आणि सरकारकडून मिळवा तब्बल अडीच लाख रुपये

 आता ‘या’ पद्धतीने लग्न करा आणि सरकारकडून मिळवा तब्बल अडीच लाख रुपये


मुंबई : भारतीय समाज व्यवस्थेतील जातीवाद हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. या जातीवादाविरोधात उभं राहणं ही काळाची गरज आहे. समाजातील असमानता तसेच जातीय मतभेद दूर व्हावेत यासाठी सरकार देखील वेळोवेळी महत्वाची पावलं उचलताना दिसते. जाती-पाती विसरून संपूर्ण समाज एकसंघ पद्धतीने राहावा यासाठी सरकार देखील प्रयत्नशील आहे.

अंधश्रध्दा, जातीय वाद, सरंजामी रूढी-परंपरा तसेच जातपंचायतीच्या बंधनांतून समाजाला मुक्त करण्यासाठी सरकार आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देताना दिसत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहब आंबेडकर यांच्या द्वितीय पत्नी डॉ.माईसाहेब आंबेडकर यांच्या नावाने सरकारने आंतरजातीय विवाहाची योजना सुरु केलेली आहे. या योजनेनुसार आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला तब्बल अडीच लाख रुपयांची मदत सरकार करत आहे.सुरुवातीला पती पत्नीपैकी एक व्यक्ती अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जातीची तर दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, लिंगायत, जैन व शीख यांपैकी असल्यास तो आंतरजातीय विवाह मानला जात असे. मात्र २००४ नंतर सरकारने आंतरजातीय विवाहाची व्याप्ती अधिक वाढवली आहे.

आता ही योजना सुरु झाल्यापासून बऱ्याच जोडप्यांनी लाभ घेतला आहे. समाजातील जातीभेदाची दरी दूर व्हावी आणि समाजातील जातीविषयक तेढ नष्ट व्हावे या उद्देशाने आंतरजातीय विवाह योजनेला सरकार प्रोत्साहन देत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.