Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोणा चारचौघांच्या इच्छेने राज्यातील सरकार बरखास्त होणार नाही - ना. जयंत पाटील

 कोणा चारचौघांच्या इच्छेने राज्यातील सरकार बरखास्त होणार नाही - ना. जयंत पाटील


राज्यात महाविकास आघाडी सरकार भक्कमपणाने काम करत असताना ते पाडण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.  मात्र कोणाच्याही इच्छेने हे सरकार बरखास्त होणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. राज्य सरकार घटनेच्या चौकटीत राहून काम करत आहे. त्यामुळे सरकार बरखास्त करण्याचे अधिकार कोणालाही नाहीत. विधानसभेत जोवर आमच्या महाविकास आघाडीचे बहुमत आहे तोवर सरकार जाणे शक्य नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले. राजकीयदृष्ट्या प्रेरित होऊन, यंत्रणेचा वापर करून राज्य सरकार मधील नेत्यांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे याची जाणीव जनतेला झाली आहे. खोटे आरोप करणे, आर्थिकदृष्ट्या अडकवणे, अशा गोष्टी केवळ सरकार पाडण्यासाठी केल्या जात आहेत. एखाद्या गोष्टीचा टोकाचा अर्थ काढून छापेमारी केली जाते, हे जनतेने ओळखले असल्याचे जयंत पाटील म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.