त्रिपुरा घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
सांगली, दि. 15, : त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने रझा अकादमीने 12 नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या बंद दरम्यान घडलेल्या घटनेचे पडसाद उमटून महाराष्ट्रात अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद व कारंजा या ठिकाणी जातीय हिंसाचार झालेला आहे. यापूर्वीची पार्श्वभूमी पाहता सांगली जिल्ह्यामध्ये या घटनेचा फायदा घेवून काही समाज कंटक दोन समाजामध्ये, गटांमध्ये तेड निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दिनांक 15 नोव्हेंबर 2021 रोजीचे 18.00 वाजल्यापासून दि. 20 नोव्हेंबर 2021 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत पाच व पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येणे, सभा घेणे, तसेच शस्त्र, लाठी, काठी बाळगण्यास प्रतिबंध केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.