Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न; उपचारानंतर मृत्यू

 पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न; उपचारानंतर मृत्यू


मुंबई :  पुणे जिल्ह्यातील आंबेगाव  तालुक्यातील मंचर  येथील ४८ वर्षीय शेतकऱ्याने २० ऑगस्टला मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर मुंबईतील जी.टी. रुग्णालयात  उपचार सुरु होता. डॉक्टरांनी त्यांचा प्राण वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न केले. पण उपचारादरम्यान, शेतकऱ्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर संपली आहे. सुभाष जाधव  असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे  सर्वत्र खळबळ उडाली आहे.

जमिनीच्या व्यवहारात सुभाष जाधव यांची फसवणूक झाली होती. त्यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात ही धाव घेतली होती. पण तिथे त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ते काही दिवसापासून अस्वस्थ होते. शुक्रवारी सकाळी (दि २०) ते मुंबईत मंत्रालय परिसरात आले होते. त्यांनी गार्डन गेट प्रवेशद्वारातून मंत्रालयात येण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र त्यांना प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी गेटजवळच कीटकनाशक प्राशन केले. त्या ठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांच्या नजरेस ही बाब आल्यावर त्यांना पोलिसांनी तातडीने जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला.


 

या दुर्दैवी घटनेमुळे धर्मा पाटील या शेतकऱ्याच्या आत्महत्येची घटना पुन्हा ताजी झाली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून शेतकरी सुभाष जाधव यांनी आपली व्यथा मांडली होती. त्या पत्रात त्यांनी आरोपींनी आपल्याला व कुटुंबियांना मारहाण करुन, अर्धनग्न करुन जमीन बळकावली, असा आरोप केला होता. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.