Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नारायण राणे जरी मंत्री असले, तरी त्यांना निर्णय मोदींनाच विचारुन घ्यावे लागतील'

 नारायण राणे जरी मंत्री असले, तरी त्यांना निर्णय मोदींनाच विचारुन घ्यावे लागतील'



मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. 'एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असले तरी ते सहीपुरते आहेत. मातोश्रीच्या परवानगीशिवाय एकही फाईल हालत नाही,' असे नारायण राणे म्हणाले. यावर तुमच्याकडे येणार आहेत का? असे विचारण्यात आले असता, 'आले तर घेऊन टाकू' असे उत्तर दिले.


एकनाथ शिंदे या प्रकाराला कंटाळले असून लवकरच निर्णय होईल, असा गौप्यस्फोट यावेळी नारायण राणे यांनी केला. यावर आता आता एकनाथ शिंदे यांनी यावर प्रत्युत्तर दिलं असून राणेंवर जोरदार पलटवार केला आहे. ते म्हणाले,'नारायण राणे जरी मंत्री असले तरी त्यांना धोरणात्मक निर्णय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच विचारुन घ्यावे लागतील. असं म्हणत त्यांनी राणेंना टोला लगावला आहे.

एकनाथ शिंदे यांनी राणेंनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावला. ते म्हणाले, नारायण राणे युतीच्या काळात मुख्यमंत्री राहिले आहेत त्यांना माहिती असेलच धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल त्यावेळी नगरविकासच नाही तर कोणत्याही खात्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्याच संमतीने मंत्रिमंडळाला घ्यावा लागतो.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.