संजय गांधी निराधार योजनेचा महिला मेळावा
मा नामदार जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाळवा तालुक्यातील कसबे डिग्रज या गावात समिती आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत संजय गांधी निराधार योजनेचा महिला मेळावा पार पडला या मेळाव्याचे नियोजन या भागातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत हरी कांबळे आणि माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब सायमोते यांनी केले यावेळी समिती च्या अध्यक्षा ज्योती आदाटे यांनी लाभार्थी महिलांच्या समस्या जाणुन घेतल्या त्यांना या योजनेचा लाभ कसा घेता येईल व त्याचे अटी व नियम समजावून सांगितले तसेच कोणत्याही दलालाकडे प्रस्ताव देऊ नये असा सल्ला दिला हे प्रस्ताव पुर्ण होण्यासाठी त्या गावातील सामाजिक कार्यकर्त्या विजाता कांबळे दिपाली कांबळे आणि मोनिका कांबळे या तीघीनी सर्वतोपरी प्रस्ताव पुर्ण करून देण्याची जबाबदारी घेतली आहे यासाठी भरत कांबळे आणि ग्रामपंचायत सदस्य अण्णा साहेब सायमोते यांनी पुर्णपणे मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी ज्योती आदाटे म्हणाल्या कि सर्व माता भगिनी नी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी जी काही प्रशासकीय पातळीवर प्रस्ताव पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल पण नियमांचे काटेकोरपणे पालन झालेच पाहिजे असे सांगितले यावेळी समिती सदस्य आप्पासो ढोले यांनी ही मार्गदर्शन केले त्यानंतर माजी सरपंच व सदस्य अण्णा साहेब सायमोते म्हणाले की अशा महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालुन ही समिती आपल्या प्रश्नासाठी आपल्या समस्या जाणुन घेण्यासाठी आल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार या मेळाव्यासाठी सहायक प्रियांका तुपलोंडे यांनीही मार्गदर्शन केले या बैठकीत विशाल कांबळे सचिन कांबळे राजु पांढरे सुवर्णा कांबळे सखुबाई कांबळे शरद डिग्रजकर समिर कांबळे उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.