Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्रातील 'या' 22 गावांत कडक लॉकडाऊन

 महाराष्ट्रातील 'या' 22 गावांत कडक लॉकडाऊन



मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील 22 गावांत 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. पारनेर तालुक्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी येथील परिस्थितीची दखल घेतल कठोर उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 22 गावांत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.

सोबतच शंभर टक्के चाचण्या तसंच बाहेरुन येणा-यांचं गावातील शाळेत 7 दिवसांचं विलगीकरण करण्यात येणार आहे. लॉकडाऊन काळात गावांत फक्त औषध दुकाने भाजीपाला, दूध आणि कृषी सेवा केंद्र सुरू राहणार आहेत. लग्न, वाढदिवस, उद्घाटन किंवा कोणताही समारंभ परवानगी शिवाय घेता येणार नाही. तसंच विनामास्क फिरणारे, चौकात पारावर विनाकारण बसणारे, फिरणारे यांचे फोटो काढुन त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

रुग्णसंख्या वाढीनं चिंता वाढवली आहे. मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीची दखल घेतली. अहमदनगर जिल्ह्यातून रूग्णसंख्या वाढत असताना महत्वाचा निर्णय घेण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील 22 गावांत 8 दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आला. पारनेर तालुक्यात कोरोना रुग्णांत झपाट्यानं वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मुख्यमंत्र्यांनी कोरोना स्थितीची दखल घेत बाहेरुन येणा-यांचं 7 दिवस विलगीकरण सक्तीचं केलं आहे

तालुक्यातील निघोज, पठारवाडी, धोत्रे, टाकळी ढोकेश्वर, वडगाव गुंड, शिरसुले, रायतळे, लोणीमावळा, भाळवणी, पिंप्री जलसेन, जामगाव, पठारवाडी, जवळा, हत्तलंखिंडी, पिंपळगाव रोठा, लोणी हवेली, पोखरी, वनकुटे, काकणेवाडी, खडकवाडी, सावरगाव, वाळवणे या गावांत कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. पुढील आठ दिवस या गावांत फक्त औषध दुकाने भाजीपाला, दूध आणि कृषी सेवा केंद्र सुरू राहणार आहेत. लग्न, वाढदिवस, उद्घाटन किंवा कोणताही समारंभ परवानगी शिवाय घेता येणार नाही. बाहेरुन आलेले पाहुणे सात दिवस शाळेत विलगीकरणात ठेवण्यात येणार आहेत.

अमरावती जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचा धोका कायम आहे. आत्तापर्यंत म्युकरमायकोसिसचे 20 बळी, तर 122 जणांवर अद्याप उपचार सुरू आहे. हा धोका वाढता पाहता अहमदनगरमध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.